Tuesday 20 December 2011

भारतीय social site users असंवेदनशील आहेत का?

 गेल्या ८-९ महिण्यामध्ये मध्य पूर्व आफ्रीकेतील बर्याच देशांमध्ये क्रांती घडून आली. ह्या क्रांतीमध्ये social sites चा फार मोठा उपयोग करून घेण्यात आला. फेसबुक, ट्विटर च्या माध्यमातून आंदोलनाचे आवाहन केले गेले आणि म्हणूनच आंदोलन यशस्वी झाले. भारतात पण जनलोकपाल विधेयकसाठी फेसबुक, ट्विटर च्या माध्यमातून आंदोलनाचे आवाहन केले गेले आणि ते पण यशस्वी होत आहे. भारतात social sites वरून केलेले आवाहन आणि त्याला मिळालेला प्रतिसाद स्तुत्य आहे. परंतु भारतीय social site users संवेदनशील आहेत? मला आलेल्या अनुभवावरून तर नक्कीच नाही. ऐका माझा अनुभव आणि तुम्हीच ठरवा.
       ४-५ महिन्यांपूर्वी माझ्या एका मित्राच्या आईला cancer असल्याचे निदान झाले. तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यासाठी किमान ४ रक्त पिशव्यांची गरज होती. परंतु रक्त बँक मधून फक्त एक रक्त पिशवी उपलब्ध झाली. त्यामुळे मी फेसबुक वरून रक्तदानसाठी माझ्या अकौंट मध्ये जोडलेले मित्र आणि विविध प्रकारचे groups मिळून किमान ३००० social site users ला आवाहन केले. त्या पोस्ट ला मिळालेला प्रतिसाद पाहून मी थक्क झालो. चक्क ० लाईक आणि ३ कमेंट्स!
     एरवी माझ्या कोणत्याही नॉर्मल पोस्टला चांगला प्रतिसाद मिळतो. पण ह्या पोस्टला मिळालेला प्रतिसाद पाहून मला वाटते कि भारतीय social site users असंवेदनशील आहेत. आपले काय मत आहे हे कळवा.
    


     
                       

3 comments:

  1. मुस्लिम जास्त संवेदनशील आहेत असे सांगताना हिंदूंबर लाथा झाडण्याची गरज नाही असे मला वाटते.

    ReplyDelete
  2. इथे हिंदू मुस्लिमांना कंसीडर न करता फक्त भारतीय म्हणून कंसीडर करा.

    ReplyDelete
  3. नमस्कार, आपला ब्लॉग मराठी ब्लॉग जगतशी जोडला गेलेला आहे. म. ब्लॉ.ज.ला भेट देणार्‍या वाचकांना आपल्या ब्लॉगची माहिती देण्यासाठी म.ब्लॉ.ज.चे ओळखचिन्ह आपल्या ब्लॉगवर अवश्य लावा. म.ब्लॉ.ज.च्या फेसबुक पेजला व ट्विटर पेजला देखील अवश्य भेट द्या.

    ReplyDelete